
गेले अनेक दिवसापासून शेतकरी अनेक अस्मानी संकटाना तोंड देत असून वेळोवेळी होणाऱ्या नुकसानीतून सावरत असताना आणि उत्पन्न आणि खर्च याचा कुठल्याही प्रकारे मेळ बसत नसल्याने आणि मिळणाऱ्या बाजारभावामुळे तसेच आखाती देशात चाललेल्या युद्धामुळे खत दर वाढ सोसावी लागत आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला खत दर वाढीचा चांगलाच फटका बसला आहे.
यामुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे.
तरी याकडे सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

