माननीय सरपंच शरद राव आरगडे अहिल्यानगर सौंदाळा गावचे सरपंच आहेत. यांनी स्वतःचा दहावा जिवंतपणे घातला आणि कावळा शिवतो का ते पाहिले परंतु जिवंतपणे ही त्यांच्या पिंडाला कावळा शिवला
त्यानंतर त्यांनी असे मत व्यक्त केली की ही एक अंधश्रद्धा असून कुठल्या हे अंधश्रद्धेला बळी न पडता आपण स्वतः सखोल माहिती घ्यावी असे त्यांनी मत व्यक्त केले आणि या असल्या अंधश्रद्धेपोटीच अशोक खरात सारखे भोंदू निर्माण होतात असे मत त्यांनी व्यक्त केले.
दहाव्याच्या ताटाकडे कावळा भुकेने येतो त्याचा वृत्तांशी संबंध नसतो तो अन्नच पाहतो भावनांना अर्थ देतो आपणच आपल्या मनाने सत्य मात्र साधं असतं .. निसर्ग नियमाने चालतो असे मत त्यांनी व्यक्त केले.
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी एक सामाजिक उपक्रम म्हणून त्यांनी हा उपक्रम राबविला.
अंधश्रद्धा अज्ञानातून भीती निर्माण करते तर विज्ञान ज्ञानाच्या प्रकाशातून सत्य समोर आणते असेही मत त्यांनी वक्त केले.

